"We now request all the remaining passengers to board the aircraft". अशी सूचना ऐकू आली कि एका यंत्रा सारखा आपलं सामान घेऊन, Terminal मधून बाहेर पडून विमाना च्या दिशेने चालत असताना, अचानक मागून एक आवाज ऐकू आला ."चाललास का रे, तू मला सोडून??" त्या आवाजातील आर्तता, व्याकुळता ऐकून मी नकळत त्या आवाजा कडे खेचलो गेलो..... मी वळालो, जणू ती हाक माझ्यासाठीच होती. मागे वळून बघतो तर कोणीच नाही, मला भास झाला असावा असं म्हणत मी परत विमाना च्या दिशेने निघालो, एक पाउल पुढे टाकताच परत तोच आवाज, तीच उत्कटता आणि तेच प्रेम!!!!!!....
या वेळेला मात्र मी तो आवाज नीट ऐकला होता, मी थांबलो ...इकडे तिकडे बघितलं...कोणीच नाही!!!!!... पण या वेळेस मी थबकलो होतो, विचार डोक्यात गर्दी करत असतानाच पुन्हा तोच आवाज आला, या वेळेस थोडं बळ होत त्यात. "चाललास का तू पण..... मला सोडून!!!!".
मी विचारलं "माझ्याशी बोलता आहात का...कोण आहात तुम्ही, मला दिसत का नाहीत!!!". तेच उत्तर आलं," हो तूच!!!, तुझ्याशीच बोलते आहे. मी इकडे अश्या हाका मारत असते फार थोडे ऐकतात, काही ऐकून न ऐकल्या सारखं करतात, तू ऐकून थांबलास...... बरं वाटलं!!!!".
मी विचारलं ,"कोण आहात तुम्ही, माझी आई तर विमान-तळा च्या बाहेर आहे , कदाचित एव्हाना घरी ही गेली असेल....". पटकन उत्तर आलं ,
" मी ही आई च आहे, फक्त फरक येवढाच, की त्या जन्मदात्या आई साठी तू परत येशील, किंवा तिला बोलावून घेशील.....आणि ती ही येईल.....पण मी नाही येऊ शकत.....मला तुझ्या सारखं सगळं सोडून नाही येत येणार आणि तू ही माझ्या साठी परत नाही येणार!!!... माझी आठवण ही नाही येणार आणि मला कश्यात गृहीत ही नाही धरणार..... तशी ही माझी आठवण फक्त वर्षातून दोनदाच होते.....ते ही सुट्टी मिळते म्हणून...नाही का!!!!!"
मी स्तब्ध उभा होतो, मला शब्द फुटेना.... हे सर्व माझ्या बरोबर घडत आहे, हेच खरं वाटत न्हवत. माझी भारत भूमी माझ्या शी बोलत होती!!!!!!........मी हळूच विचारलं, " माझ्या कडून काय हवं आहे तुम्हाला???". उत्तर आलं , "तू...". मी अशार्याने म्हंटल ," मी!!!!"...... मी म्हणजे!!".
"अरे!!, आश्चर्य कश्याच येवढं!!, एका आई ला आपला मुलगाच हवा असणार न!!, आश्चर्य काय त्यात!!!..." ती म्हणाली.
"अहो!! पण मी हवा आहे म्हणजे काय!!.... मी निघालो आहे... विमानात बसणार आता...आणि..........." मला या पुढे काही सुचेच ना!!!!..... मी शब्द शोधत असताना तीच म्हणाली...
".....आणी लांब निघून जाणार, परत कधी ही न येण्यासाठी, मला सोडून..........". मला न बोलावलेलं वाक्य स्पष्ट पणे पूर्ण केलं!!!!
मी अजून ही शब्दच शोधत होतो ," अहो!!!! नाही.......म्हणजे कायमच असं नाही...पण....काही वर्ष असं....म्हणजे............." आणी थोडे थोडके शब्द जे भाषे कडून उसने आणले होते, ते ही खर्च करून टाकले.
" का जातोस!!!.... थांब इकडेच..... एक मला तूर्तास बाजूला ठेव, बाकी सर्व तर इकडेच आहे ना तुझं...."
"बाकी सर्व, काय सर्व!!!!.... सर्व, त्रास होणाऱ्या आणि देणाऱ्या गोष्टीच तर जास्ती आहेत, नाही का!!!"..."काय आहे सांगां..... सगळे जवळचे मित्र बाहेर, नातवाईक बाहेर, जे आहेत ते वर्षानुवर्ष भेटत नाहीत....सगळे नुसते लढ म्हंटल्या सारखे आयुष्य जगताआहेत... आपल्याला काय हवंय आहे, किती हवं आहे, कुठे पहुचायचं आहे याचा विचार न करता फक्त धावत आहेत. ठेच लागते रक्त ओघळत, आपला धक्का लागून दुसरा पडून जखमी होतो, ते बघायला ही थांबत नाहीत...............का कोणासाठी मग मी थांबू!!!"
उत्तर आलं, "माझ्या साठी थांब!!!!".
मी पटकन बोललो, "कोणासाठी.... तुमच्या साठी....म्हणजे तुम्हाला म्हनायचं देशा साठी!!!!!!"..
त्या म्हणाल्या. "देऎएश!!!...हे कधी गृहीत च धरत नाही ना तुम्ही, त्याची ही काही गरज असेल, त्याच्यासाठी ही तुमचं काही कर्तव्य आहे ...असा विचार पण नाही येत!!!........ का असं व्हावं!!!!"
"का सांगावं लागतं तुम्हाला की आपल्या जन्म दात्या आई बरोबरच माझ्या सारख्या आई साठी पण तुमचं कर्तव्य आहे!!!!!...तिच्या एवढी किंवा जास्ती मला तुमची गरज आहे!!!..."
माझ्या मनात खरच एकदा ही "मी माझा देश सोडून जातो आहे" हे शिवलं ही न्हवत, मी माझ्या निर्णया मध्ये देशाचा किंवा समजाचा कधीच विचार केला न्हवता.....आता अचानक दुर्लक्ष केलेली ही आई मला जाब विचारात होती!!!!!!
मी नेहमी प्रमाणे, जवाबदारी झटकून टाकण्याची ठरलेली किंवा स्वतःहून ठरवलेली कारणं द्यायला लागलो...... "कुठचा देश, हा देश जिथे मी सकाळी गेलो की येई पर्यंत घरचे चिंतेत असतात, की हा देश जिथे रोजचा साधा कामावर जायचा प्रवास ही जीवघेणा असतो, की तो देश जिथे बापाला आपलं पोर दोन-दोन दिवस झोपलेलंच दिसतं, की तो देश जिथे महागाई चा बकासुर झाला आहे ज्याला संपवणारे पांडव दिसतच नाहीत आणि कौरव १०० नाही तर १०० कोटी झाले आहेत!!!!!......कुठल्या देशा साठी थांबायचं ..... जिथे एक एक दिवस हा लढून, स्वतःचा रोज एक छोटा अंश, मग तो शारीरिक असो का मानसिक, संपवून, नष्ट करून मावळतो. असे बरेच वर्ष स्वतःला संपवून,आयुष्य शेवटी अंथरून ला चिटकून, रोजच्या धकाधकीने दिलेल्या आजारांना बळी पडून किंवा काही अवेळी, अकाली एखाद्या अपघातात किंवा विस्फोटात आणि काहीच नाही तर दंगलीत संपतं !!!!!!....ह्या देशासाठी थांबू!!!!"
"जिथे पिकतं तिथे विकत नाही अस म्हणतात पण आपल्या कडे तर ही म्हण माणसां बाबतीत च खरी ठरली आहे....इतकी माणसं पिकवतो आपण की माणसाची च कदर नाही माणसालाच !!!!!..... अश्या साठी राहायचं इथे!!!!..... "
त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि मग म्हणाली, "हे सर्व देशाने दिलं तुला...किंवा या पलीकडे देशाने काहीच दिल नाही???....... तू जे जे आता म्हणालास त्या पेकी काय देशाने दिल आहे!!!!....अपघात, विस्फोट, खराब रस्ते, भ्रष्टाचार, महागाई, जन संख्या हे देशाने दिले आहेत, का काही याच मातीत जन्मेलेल्या, तुझ्याच भावंडांच्या कर्माची फळे आहेत.
तू आपल्या घराच्या चाव्या चोराच्या हाती दिल्यास ....तो ते लूटणारच!!!!!..... अरे!!!... बस मध्ये चढल्या वर, कोणाच्या बाजूला बसायचं हे ही पारखून, स्वतःची खात्री करून मग बसणारे तुम्ही, देश कोणाच्या हातात देत आहात हे ही बघत नाहीत.......तोचुकीच्या माणसांना चालवायला दिला आहेस, ही त्याचे फळे आहे!!!!!"
आपल्या जबाबदारी न ओळखता, दुसर्याला दोष देऊन, शेवटी निव्वळ अप्पलपोटे पणा दाखवून, परीस्थिती शी लढायचं सोडून पाठ फिरवून पळून जातो आहेस!!!!.असं नाही वाटत तुला."
"म्हणजे!!, थोडक्यात काय तर भगत सिंग जन्माला यावा, पण तो शेजारी......नाही का!!.....त्याच्या चितेच्या निखार्याने आपली घरं , आयुष्य उजळी तर ते हवे आहे पण त्या चिते वरचे प्रेत आपले नको!!!!".
"ही परिस्थिती बदलायचा, त्यात काही तरी फरक पाडण्याचा, किंवा जे आण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याशी जोडून घेण्याचा तरी प्रयत्न केलास का कधी..... तू जातो आहेस याचं वाईट नाही वाटत आहे, तू प्रयत्न न करता, हा पराभव गृहीत धरला आहेस याची खंत आहे......"
"अरे, आपल्या देशाच्या निवडणुकी पेक्षा अमेरिके ची निवडणूक जास्ती उतुस्क्तेने बघणारे आणि ऐकणारे तुम्ही, तुम्हाला काय सांगयचं."
"राजे-शाहीत "जैसा राजा तैसी प्रजा", असं म्हतात पण तेच लोकशाहीत "जैसी प्रजा तैसा राजा" असा कारभार चालतो. तो तसाच चालतो जसा तुम्हाला चालवायचा आहे किंवा चालवू द्यायचा आहे!!!!"
"कंपनी च्या प्रोजेक्ट साठी सुद्धा 'Retrospection Meeting' घेणारे तुम्ही आपल्या देशा बद्दल, आपण त्या साठी काय करतो, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काही वेगळं, नवीन करू शकतो का असं कुठलं ही आत्मपरीक्षण करत नाही!!!!...का??..का नाही करत???..त्याचे कोणी पैसे देत नाही म्हणून!!!!"
"परक्या देशात, परक्यान साठी, परक्यान बरोबर नेहमी मनात परके पणाची भावना ठेवून जगण्या पेक्षा आपल्याच देशाला आपलं मानून आणि बनवून, त्याच्या शीच नव्याने एक नातं जोडून राहिलास तर तेच परके लोक इथे येतील, आपल्या समृद्धीचा भाग व्हायला, तिला उपभोगायला!!!..असा नाही वाटत तुला!!!"
"नुसती मंदिरे, आणि मस्जीदी बांधून भूमी पवित्र होत नसते."
"मंदिर देवाच आहे, म्हणून त्यात पवित्र, शांत वाटत नाही, ते सांभाळणारे, व्यवस्थित ठेवणारे, झाडू वाले व इतर सफाई कामगार त्याचं पावित्र्य टिकवतात, सांभाळतात!!!!!... एखादे घाण झालेल्या मंदिरात तुम्ही देवाला ही एकट सोडून जाल.................त्यात माझी किंवा देशाची काय बात!!!!"
तिथे उभं राहण असह्य झालं होत, माझ्यात सत्य पचवण्याची सोडा पण ऐकायची ही क्षमता राहिली नाही, हे त्या दिवशी मला कळलं आणि लाज वाटली. मला अस्वस्थ पाहून तीच थांबली, शेवटी आईच ती, मुलाला किती ही बोलली तरी शेवटी प्रेम आणि आशीर्वादाच देणार.
माझ्या तोंडातून शब्द फुटत न्हवते, कसं-बसं बळ आणून मी म्हणालो." मी निघतो........." आणि पाठ फिरवून सरळ विमानच्या दिशेने वेगाने निघालो..........
तिचा मागून आवाज येत होता,"अरे, बघ तुझ्या सारखे अजून आहेत, त्यांच्या जोडीने आपण बदल घडवू, अरे!! आई आई असते रे, आणि घर घर असतं....आपलं आवडलं नाही म्हून सोडून नाही जात असं.......ऐक..ऐक हे बघ.............."
मी तडक विमान जाऊन बसलो आणि कान बंद करून घेतले......विमाच यंत्रांचा आवाज सुरु झाला आणि त्यात तिची ती केविलवाणी हाक दाबून चिरडली गेली............
विमान धावपट्टी च्या दिशेने निघाले आणि एकदम वेग घेऊन अचानक दोन क्षणात जमिनीवर उचलल्या गेले. आपल्या मुलाला भरारी देण्यासाठी तिने आपल्याच छातीची धावपट्टी केली होती.
तुटलेल्या, जखमी झालेल्या त्या काळजातून शेवटची ऐकू आलेली पुसटशी वाक्य अजून ही कानात घुमतात
"गेला!!! आपल्या आई ला पोरकं करून.......!!!!!!"
या वेळेला मात्र मी तो आवाज नीट ऐकला होता, मी थांबलो ...इकडे तिकडे बघितलं...कोणीच नाही!!!!!... पण या वेळेस मी थबकलो होतो, विचार डोक्यात गर्दी करत असतानाच पुन्हा तोच आवाज आला, या वेळेस थोडं बळ होत त्यात. "चाललास का तू पण..... मला सोडून!!!!".
मी विचारलं "माझ्याशी बोलता आहात का...कोण आहात तुम्ही, मला दिसत का नाहीत!!!". तेच उत्तर आलं," हो तूच!!!, तुझ्याशीच बोलते आहे. मी इकडे अश्या हाका मारत असते फार थोडे ऐकतात, काही ऐकून न ऐकल्या सारखं करतात, तू ऐकून थांबलास...... बरं वाटलं!!!!".
मी विचारलं ,"कोण आहात तुम्ही, माझी आई तर विमान-तळा च्या बाहेर आहे , कदाचित एव्हाना घरी ही गेली असेल....". पटकन उत्तर आलं ,
" मी ही आई च आहे, फक्त फरक येवढाच, की त्या जन्मदात्या आई साठी तू परत येशील, किंवा तिला बोलावून घेशील.....आणि ती ही येईल.....पण मी नाही येऊ शकत.....मला तुझ्या सारखं सगळं सोडून नाही येत येणार आणि तू ही माझ्या साठी परत नाही येणार!!!... माझी आठवण ही नाही येणार आणि मला कश्यात गृहीत ही नाही धरणार..... तशी ही माझी आठवण फक्त वर्षातून दोनदाच होते.....ते ही सुट्टी मिळते म्हणून...नाही का!!!!!"
मी स्तब्ध उभा होतो, मला शब्द फुटेना.... हे सर्व माझ्या बरोबर घडत आहे, हेच खरं वाटत न्हवत. माझी भारत भूमी माझ्या शी बोलत होती!!!!!!........मी हळूच विचारलं, " माझ्या कडून काय हवं आहे तुम्हाला???". उत्तर आलं , "तू...". मी अशार्याने म्हंटल ," मी!!!!"...... मी म्हणजे!!".
"अरे!!, आश्चर्य कश्याच येवढं!!, एका आई ला आपला मुलगाच हवा असणार न!!, आश्चर्य काय त्यात!!!..." ती म्हणाली.
"अहो!! पण मी हवा आहे म्हणजे काय!!.... मी निघालो आहे... विमानात बसणार आता...आणि..........." मला या पुढे काही सुचेच ना!!!!..... मी शब्द शोधत असताना तीच म्हणाली...
".....आणी लांब निघून जाणार, परत कधी ही न येण्यासाठी, मला सोडून..........". मला न बोलावलेलं वाक्य स्पष्ट पणे पूर्ण केलं!!!!
मी अजून ही शब्दच शोधत होतो ," अहो!!!! नाही.......म्हणजे कायमच असं नाही...पण....काही वर्ष असं....म्हणजे............." आणी थोडे थोडके शब्द जे भाषे कडून उसने आणले होते, ते ही खर्च करून टाकले.
" का जातोस!!!.... थांब इकडेच..... एक मला तूर्तास बाजूला ठेव, बाकी सर्व तर इकडेच आहे ना तुझं...."
"बाकी सर्व, काय सर्व!!!!.... सर्व, त्रास होणाऱ्या आणि देणाऱ्या गोष्टीच तर जास्ती आहेत, नाही का!!!"..."काय आहे सांगां..... सगळे जवळचे मित्र बाहेर, नातवाईक बाहेर, जे आहेत ते वर्षानुवर्ष भेटत नाहीत....सगळे नुसते लढ म्हंटल्या सारखे आयुष्य जगताआहेत... आपल्याला काय हवंय आहे, किती हवं आहे, कुठे पहुचायचं आहे याचा विचार न करता फक्त धावत आहेत. ठेच लागते रक्त ओघळत, आपला धक्का लागून दुसरा पडून जखमी होतो, ते बघायला ही थांबत नाहीत...............का कोणासाठी मग मी थांबू!!!"
उत्तर आलं, "माझ्या साठी थांब!!!!".
मी पटकन बोललो, "कोणासाठी.... तुमच्या साठी....म्हणजे तुम्हाला म्हनायचं देशा साठी!!!!!!"..
त्या म्हणाल्या. "देऎएश!!!...हे कधी गृहीत च धरत नाही ना तुम्ही, त्याची ही काही गरज असेल, त्याच्यासाठी ही तुमचं काही कर्तव्य आहे ...असा विचार पण नाही येत!!!........ का असं व्हावं!!!!"
"का सांगावं लागतं तुम्हाला की आपल्या जन्म दात्या आई बरोबरच माझ्या सारख्या आई साठी पण तुमचं कर्तव्य आहे!!!!!...तिच्या एवढी किंवा जास्ती मला तुमची गरज आहे!!!..."
माझ्या मनात खरच एकदा ही "मी माझा देश सोडून जातो आहे" हे शिवलं ही न्हवत, मी माझ्या निर्णया मध्ये देशाचा किंवा समजाचा कधीच विचार केला न्हवता.....आता अचानक दुर्लक्ष केलेली ही आई मला जाब विचारात होती!!!!!!
मी नेहमी प्रमाणे, जवाबदारी झटकून टाकण्याची ठरलेली किंवा स्वतःहून ठरवलेली कारणं द्यायला लागलो...... "कुठचा देश, हा देश जिथे मी सकाळी गेलो की येई पर्यंत घरचे चिंतेत असतात, की हा देश जिथे रोजचा साधा कामावर जायचा प्रवास ही जीवघेणा असतो, की तो देश जिथे बापाला आपलं पोर दोन-दोन दिवस झोपलेलंच दिसतं, की तो देश जिथे महागाई चा बकासुर झाला आहे ज्याला संपवणारे पांडव दिसतच नाहीत आणि कौरव १०० नाही तर १०० कोटी झाले आहेत!!!!!......कुठल्या देशा साठी थांबायचं ..... जिथे एक एक दिवस हा लढून, स्वतःचा रोज एक छोटा अंश, मग तो शारीरिक असो का मानसिक, संपवून, नष्ट करून मावळतो. असे बरेच वर्ष स्वतःला संपवून,आयुष्य शेवटी अंथरून ला चिटकून, रोजच्या धकाधकीने दिलेल्या आजारांना बळी पडून किंवा काही अवेळी, अकाली एखाद्या अपघातात किंवा विस्फोटात आणि काहीच नाही तर दंगलीत संपतं !!!!!!....ह्या देशासाठी थांबू!!!!"
"जिथे पिकतं तिथे विकत नाही अस म्हणतात पण आपल्या कडे तर ही म्हण माणसां बाबतीत च खरी ठरली आहे....इतकी माणसं पिकवतो आपण की माणसाची च कदर नाही माणसालाच !!!!!..... अश्या साठी राहायचं इथे!!!!..... "
त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि मग म्हणाली, "हे सर्व देशाने दिलं तुला...किंवा या पलीकडे देशाने काहीच दिल नाही???....... तू जे जे आता म्हणालास त्या पेकी काय देशाने दिल आहे!!!!....अपघात, विस्फोट, खराब रस्ते, भ्रष्टाचार, महागाई, जन संख्या हे देशाने दिले आहेत, का काही याच मातीत जन्मेलेल्या, तुझ्याच भावंडांच्या कर्माची फळे आहेत.
तू आपल्या घराच्या चाव्या चोराच्या हाती दिल्यास ....तो ते लूटणारच!!!!!..... अरे!!!... बस मध्ये चढल्या वर, कोणाच्या बाजूला बसायचं हे ही पारखून, स्वतःची खात्री करून मग बसणारे तुम्ही, देश कोणाच्या हातात देत आहात हे ही बघत नाहीत.......तोचुकीच्या माणसांना चालवायला दिला आहेस, ही त्याचे फळे आहे!!!!!"
आपल्या जबाबदारी न ओळखता, दुसर्याला दोष देऊन, शेवटी निव्वळ अप्पलपोटे पणा दाखवून, परीस्थिती शी लढायचं सोडून पाठ फिरवून पळून जातो आहेस!!!!.असं नाही वाटत तुला."
"म्हणजे!!, थोडक्यात काय तर भगत सिंग जन्माला यावा, पण तो शेजारी......नाही का!!.....त्याच्या चितेच्या निखार्याने आपली घरं , आयुष्य उजळी तर ते हवे आहे पण त्या चिते वरचे प्रेत आपले नको!!!!".
"ही परिस्थिती बदलायचा, त्यात काही तरी फरक पाडण्याचा, किंवा जे आण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याशी जोडून घेण्याचा तरी प्रयत्न केलास का कधी..... तू जातो आहेस याचं वाईट नाही वाटत आहे, तू प्रयत्न न करता, हा पराभव गृहीत धरला आहेस याची खंत आहे......"
"अरे, आपल्या देशाच्या निवडणुकी पेक्षा अमेरिके ची निवडणूक जास्ती उतुस्क्तेने बघणारे आणि ऐकणारे तुम्ही, तुम्हाला काय सांगयचं."
"राजे-शाहीत "जैसा राजा तैसी प्रजा", असं म्हतात पण तेच लोकशाहीत "जैसी प्रजा तैसा राजा" असा कारभार चालतो. तो तसाच चालतो जसा तुम्हाला चालवायचा आहे किंवा चालवू द्यायचा आहे!!!!"
"कंपनी च्या प्रोजेक्ट साठी सुद्धा 'Retrospection Meeting' घेणारे तुम्ही आपल्या देशा बद्दल, आपण त्या साठी काय करतो, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, काही वेगळं, नवीन करू शकतो का असं कुठलं ही आत्मपरीक्षण करत नाही!!!!...का??..का नाही करत???..त्याचे कोणी पैसे देत नाही म्हणून!!!!"
"परक्या देशात, परक्यान साठी, परक्यान बरोबर नेहमी मनात परके पणाची भावना ठेवून जगण्या पेक्षा आपल्याच देशाला आपलं मानून आणि बनवून, त्याच्या शीच नव्याने एक नातं जोडून राहिलास तर तेच परके लोक इथे येतील, आपल्या समृद्धीचा भाग व्हायला, तिला उपभोगायला!!!..असा नाही वाटत तुला!!!"
"नुसती मंदिरे, आणि मस्जीदी बांधून भूमी पवित्र होत नसते."
"मंदिर देवाच आहे, म्हणून त्यात पवित्र, शांत वाटत नाही, ते सांभाळणारे, व्यवस्थित ठेवणारे, झाडू वाले व इतर सफाई कामगार त्याचं पावित्र्य टिकवतात, सांभाळतात!!!!!... एखादे घाण झालेल्या मंदिरात तुम्ही देवाला ही एकट सोडून जाल.................त्यात माझी किंवा देशाची काय बात!!!!"
तिथे उभं राहण असह्य झालं होत, माझ्यात सत्य पचवण्याची सोडा पण ऐकायची ही क्षमता राहिली नाही, हे त्या दिवशी मला कळलं आणि लाज वाटली. मला अस्वस्थ पाहून तीच थांबली, शेवटी आईच ती, मुलाला किती ही बोलली तरी शेवटी प्रेम आणि आशीर्वादाच देणार.
माझ्या तोंडातून शब्द फुटत न्हवते, कसं-बसं बळ आणून मी म्हणालो." मी निघतो........." आणि पाठ फिरवून सरळ विमानच्या दिशेने वेगाने निघालो..........
तिचा मागून आवाज येत होता,"अरे, बघ तुझ्या सारखे अजून आहेत, त्यांच्या जोडीने आपण बदल घडवू, अरे!! आई आई असते रे, आणि घर घर असतं....आपलं आवडलं नाही म्हून सोडून नाही जात असं.......ऐक..ऐक हे बघ.............."
मी तडक विमान जाऊन बसलो आणि कान बंद करून घेतले......विमाच यंत्रांचा आवाज सुरु झाला आणि त्यात तिची ती केविलवाणी हाक दाबून चिरडली गेली............
विमान धावपट्टी च्या दिशेने निघाले आणि एकदम वेग घेऊन अचानक दोन क्षणात जमिनीवर उचलल्या गेले. आपल्या मुलाला भरारी देण्यासाठी तिने आपल्याच छातीची धावपट्टी केली होती.
तुटलेल्या, जखमी झालेल्या त्या काळजातून शेवटची ऐकू आलेली पुसटशी वाक्य अजून ही कानात घुमतात
"गेला!!! आपल्या आई ला पोरकं करून.......!!!!!!"
2 comments:
Looks like you are not getting enough comments.
Very touching...
Tears in eyes :-( Ashish, mast lihitos ki re! Great!!!
Post a Comment